16 मार्चपासून पुढे होणाऱ्या दहावी- बारावी बोर्ड परीक्षेच्या सर्व पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे.

म्हणजेच सकाळच्या सत्रात साडे दहानंतर आणि दुपारच्या सत्रात 3 वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यास प्रवेश न नाकारला जाणार आहे.

बोर्डाच्या मागील पेपरमध्ये उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याने निदर्शनास आल्यानंतर बोर्डाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे यापुढे परीक्षेला विद्यार्थी दिलेल्या वेळेत पोहोचू शकला नाही तर त्याला परीक्षा कक्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही

विद्यार्थ्यांनी पुढील सूचनांचे पालन करणे गरजेचे

  1. सर्व संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे गरजेचे असेल
  2. विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर म्हणजे सकाळच्या सत्रात 10.20 पर्यंत ते दुपारच्या सत्रात 2.50 मिनिटांनी पर्यंत परीक्षा केंद्रात हजर राहणे गरजेचे असेल.
  3. विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे उशिरा आल्यास त्याच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्याची सर्व तपासणी करून सकाळच्या सत्रात साडेदहा पर्यंत तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत प्रवेश दिला जाईल.
  4. मात्र, परीक्षा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात सकाळी साडेदहा नंतर तर दुपारच्या सत्रात तीन वाजेनंतर कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्याला परीक्षा कक्षा मध्ये प्रवेश दिला जाणार नाही.