रत्नागिरी- रत्नागिरीत आलेल्या महापुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण, खेड, गुहागरसह रत्नागिरीतील गावांमध्ये नेटवर्क नसल्याने नुकसानग्रस्त बाधितांचा संपर्क होत नाही. त्यांच्यासाठी ऑफलाईन सुविधा विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली आहे. रत्नागिरीत वेगळे कार्यालय नाही, मात्र जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात विमा प्रतिनिधींसाठी वेगळा कक्ष सुरू करून दिला आहे.
नऊ तालुक्यात प्रत्येकी एक प्रतिनिधी नेमण्यात आला आहे.