रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात आज १५६ जण कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसातील सर्वात कमी रुग्ण आज जिल्ह्यात सापडले आहेत. रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बाब आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज ६९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६४५१५ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.३४ टक्के झाला आहे.