मुंबई : भाजप नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड भागातील बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांनी भव्य बंगले आणि रिसॉर्ट बांधले असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यासारखीच परिवहन मंत्री अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले आहेत.