रत्नागिरी जिल्ह्यात ११ ते १२ जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता असून पुरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज झाले आहे. चार एनडीआरएफची पथके दाखल झाली असून साडेपाच हजार लोकांच्या स्थलांतराची व्यवस्था केली आहे. समुद्र, खाडी, नदी किनाऱ्यावरील पुरग्रस्त, दरडग्रस्त भागात प्रवासासाठी प्रतिबंध घातले आहेत.