रत्नागिरी : चाचणी वेळेत न झाल्यामुळे सौम्य लक्षण असलेले रुग्ण कोरोना वाहक ठरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाडीच्या वाडी बाधित येत आहे. हे टाळण्यासाठी वेळेत चाचण्या करुन घेतल्या पाहीजेत. असे झाले तरच कोरोना संक्रमण थांबेल आणि जिल्हा कोरोना मुक्त होईल, असा विश्वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला. कोरोतील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मोहीमेसंदर्भात डॉ. जाखड यांनी व्हीडीओद्वारे ग्रामस्थांना आवाहन केले आहे.