रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आजही पाचशेच्या वर गेली आहे. मागील २४ तासात ५६७ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरीयाच काळात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाचशेचे वर रुग्ण संख्येची नोंद झाल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. ५६७ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून ४० हजार २०० झाली आहे. नव्याने ५६७ रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या१५०५ पैकी ३५३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या १ हजार ७८६ पैकी २१४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.