करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे बाधित रुग्णांपेक्षा अधिक होत आहे. मागच्या २४ तासात २५ हजार ६१७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५४ लाख ८६ हजार २०६ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९४.७३ टक्के एवढा झाला आहे.