दापोली : मुश्ताक खान

कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगानं वाढ आहे. आवश्यक असेल तरच लोकांनी घरा बाहेर पडावं अशी स्थिती दापोलीमध्ये निर्माण झाली आहे. आज दिनांक ८ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवसात ३४ रूग्णांना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही आकडेवारी तशी धडकी भरवणारी आहे. आता आपण काळजी घेतली नाही तर त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागू शकेल.

सगळ्या चिंतेची गोष्ट म्हणजे नवानगरमध्ये तीन पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहे. शहरातील रूपनगर परिसर असेल किंवा फॅमिली माळ या भागात ही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. या वर्षीचीचा कोरोना स्ट्रेन अधिक झपाट्यानं पसरत आहे. दापोली पोलीस स्टेशनमधील दोन पोलीस देखील पॉझिटिव्ह आढळले आहे. शहरा शेजारी जालगावमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. याचाच अर्थ असा की पुढे धोका मोठा आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रूग्ण सापडू लागले होते. पाहता पाहता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रूग्ण संख्या १२ हजाराच्या पार गेली. एकाच दिवशी दापोली तालुक्यात ३४ जण सापडण्याची पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षीही अशी वेळ आली नव्हती. यामध्ये आरटीपीसीआसमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले १६ आहेत १८ जणांची अन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी न जाणं, मास्कचा योग्य वापर करणं, हाताचं सॅनिटायझेशन करणं, फिजीकल डिस्टन्स इमाने ऐतबारे पाळणं आवश्यक आहे. काही दिवस पार्टी, मित्रांसोबत गप्पा टप्पांचा कार्यक्रम, फिरायला जाणं टाळणं आवश्यक आहे. या काही गोष्टी ऑनलाईन करता येऊ शकणार आहेत. खबरदारी बळगा कोरोना फक्त बेजबाबदारपणे वागणाऱ्यांनाच होत नाही तर त्यांच्या घरातील वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांनाही होऊ शकतो. सर्वांना काळजी आपल्या हातामध्ये आहे असं समजून आता वागणं महत्वाचं आहे.

कुठे किती पॉझिटिव्ह आढळले
(आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट)

रत्नागिरी – ५५, खेड -११, दापोली – ३४, गुहागर – ७, चिपळूण – १६, संगमेश्वर – ११, मंडणगड – १, लांजा – ३, राजापूर – २, एकूण – १४०


रत्नागिरीमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. रूग्णालयांमध्ये जागा अपुरी पडत आहे. सर्व नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखूनच वागलं पाहिजे. दोन दिवसांत दहा जणांवर मृत्यू ओढवला आहे. कोरोना आहे आणि तो झपाट्यानं पसरत आहे हे सर्वांनी मान्य करणं आवश्यक आहे. असं न करता जर प्रत्येक जण वागत राहिला तर मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये.

तालुकानिहाय मृत व्यक्तींची आकडेवारी

रत्नागिरी – १००, खेड -६०, दापोली – ४१, गुहागर – १३, चिपळूण – ९३, संगमेश्वर – ४२, मंडणगड – ४, लांजा – १४, राजापूर – २१, एकूण – ३८८


घाबरू नका पण …
कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे म्हणून मानसिक स्वास्थ्य बिघडवून घेणंही योग्य नाही, अशी प्रतिक्रीया डॉ मुनीर सरगुरोह यांनी दिली आहे. जागरूकपणे कोरोनाशी मुकाबला करणं गरजेचं आहे. जर आपण काळजीच घेतली नाही तर स्वतः सकट आपण सर्वांना धोक्यात आणू शकतो हे ध्यानात ठेवणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

अँक्टिव्ह रूग्णांची संख्या वाढली

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अँक्टिव्ह रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. महिनाभरापूर्वी १००च्या आत असलेली अँक्टिव्ह रूग्ण संख्या आता ७८९ पर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक रूग्ण सध्या रत्नागिरीमधील महिला रूग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात उपचार घेत असलेल रूग्ण
डीसीएच कळंबणी – २८, डीसीएच महिला रूग्णालय – १४६, डीसीएच अपेक्स रूग्णालय – १८, डीसीएच, कामथे – ४५, डीसीएच दापोली – १४, डीसीएच लाईफ केअर, चिपळूण – ००, डीसीएच शिवश्री रूग्णालय, रत्नागिरी – ०२, डीसीएच श्री रूग्णालय, चिपळूण – २०, डीसीएच बीएचएम, दापोली – १२, सीसीसी समाज कल्याण भवन, रत्नागिरी – ५०, सीसीसी बिएड. कॉलेज, रत्नागिरी – ८७, सीसीसी नगर परिषद, खेड – १५, सीसीसी सिद्धविनायक रूग्णालय, चिपळूण – ०३, होम आयसोलेश – ३४९, एकूण  – ७८९


सर्वांनी खबरदारी घ्या

सर्वांनी जबाबदारीनं वागून कोरोना हद्दपार करणं अभिप्रेत आहे. प्रत्येक ठिकाणी एक ना एक कोरोनाचे रूग्ण आढळत आहेत. स्वतः सुरक्षीत राहणं आणि आपल्या जवळच्यांना सुरक्षीत ठेवणंच आता महत्तवाचं आहे. प्रत्येकानं शासनानं सांगितलेल्या खबरदारीच्या उपाय योजना पाळणं गरजेचं आहे. कोरोनाला हरवण्याच्या या लढाईत सर्वांनी एकत्रितपणे लढून जिंकायचं आहे, एवढं ध्यानी राहू द्या.