पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

रत्नागिरी : शहरात उबाठा गटाचे माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर आणि माजी नगरसेविका मीरा पिलणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्नचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थित शिवेसेनेत जाहीर प्रवेश केला.

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रत्नागिरी मधील अन्य काही ग्रामस्थांनीही आज उबाठा गटाला सोडून शिवसेनेत प्रवेश केला.

पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या माध्यमातून विकसाला चालना मिळावी त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पूर्ण व्हावीत माझ्या प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी ते हातभार लावतील, असा विश्वास यावेळी प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केला.

यावेळी माजी नगरसेवक राकेश उर्फ बाबा नागवेकर, माजी नगरसेविका मीरा पिलणकर, नितीन सुर्वे, मंदार जोशी, विक्रांत पिलणकर, मोरेश्वर मोरे, राहुल पिलणकर, महेश मोरे, शेखर भोगले, पंकज पिलनकर आदीनी प्रवेश केला आहे.