corona update

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू

कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 89% भागात वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.

वादळग्रस्तांना दापोली लायन्स क्लबतर्फे मदत

यावेळी पाडले गाव चे सरपंच सौ. अक्षता हुमणे, उपसरपंच धाडवे व सर्व सदस्य यांनी भंडारवाडा, कोंडवाडी, ब्राम्हणअळी, गुहागरकरआळी, सापटआळी यांच्या वतीने 200 पॅकेटचा स्वीकार केला.