हर्णै कोतवालावर १५ दिवसात कारवाई – समीर घारे

दापोली तालुक्यातील हर्णै गावात पंचनाम्यावरून प्रचंड घोळ सुरू आहे. ज्यांना पैसे मिळायला हवे होते त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि ज्यांचं नुकसान झालं नाही त्यांना १ लाख ६० हजार रूपये मिळालेत. त्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त करत ग्रामपंचायतीला घेराव घातला. यावेळी कोतवाल यांच्या विरोधात प्रंचड रोष जनतेच्या मनात दिसून येत होता.

दापोली नगरपंचायत शटर बंद का ?

कोरोनाच्या पर्वश्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करत सर्व कार्यालये सुरु आहेत. आज सोमवारी कोणतीही सार्वजनिक सुट्टी नसताना नगरपंचायत बंद का? असा सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.

दापोलीत आणखी एकाचा शॉक लागून मृत्यू

निसर्ग चक्रीवादळामध्ये दापोली तालुक्यातील गव्हे येथील सचिन लिंगावळे यांच्या घराचे पत्रे उडाले होते. त्यामुळे घरात पाणी शिरून लाईटचे बोर्ड खराब झाले होते. सचिन लिंगावळे आज […]

कोकण कृषी विद्यापीठ झाडांना देतंय जीवनदान

दापोली तालुक्यातील वेळवी येथे उन्मळून पडलेल्या नऊ आम्रवृक्षांना दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डाॅ संतोष वरवडेकर, समीर झगडे, राजेंद्र आग्रे, राजेश गोरिवले, संतोष बुरटे आणि चंद्रकांत कांबळे यांनी प्रत्यारोपण करून जीवनदान दिले.

No Image

त्या रूग्णानेच दिला होता दापोलीचा पत्ता

‘माय कोकण’नं कायम सत्य आणि अचूक बातमी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमचे प्रेक्षक आणि आमचे वाचक यानी या काळात  आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. माय कोकणच्या माध्यामातून माहिती तुम्हाला सातत्यानं देण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहणार आहोत.

corona update

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू

कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

रत्नागिरी जिल्ह्यातील 89% भागात वीजपुरवठा पूर्ववत

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यांसह वादळामुळे सर्वाधिक नुकसानग्रस्त इतर भागात वीज खंडित झालेल्या ४ लाख १४ हजार ६९४ पैकी ३ लाख ७० हजार ७१२ (८९.३९ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.