रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले.
मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम बांधव आणि भगिनींनी एकत्र येत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवला.
‘भारत माता की जय’चा जयघोष करत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. भारतीय मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये फूट पाडण्याचा हा कट असल्याचा आरोप करत, हल्लेखोरांना तातडीने पकडून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना मुफ्ती तौफिक सारंग म्हणाले,
“हा हल्ला मानवताविरोधी आहे आणि त्याचा भारतीय मुस्लीमांशी काहीही संबंध नाही. हा दहशतवाद असून इस्लाम धर्माला बदनाम करण्याचा कुटील डाव आहे. इस्लामचा या घटनेशी काहीही संबंध नाही. या हल्ल्यातील सर्व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही सर्व भारतीय मुस्लीमांची इच्छा आहे.”
या आंदोलनात सलीम मिरकर, शराफत गडबडे, सोहेल साखरकर, अल्ताफ संगमेश्वरी, सोहेल मुकादम, अजिम चिकटे, शोहेब खान, झाकी खान, रझ्झाक काझी, उबेद होडेकर, उझैफ साखरकर, मुसा काझी, यासीन मजगावकर, फरहान मुल्ला, फय्याज मुकादम, मुज्जू मुकादम, तबरेज सोलकर, सुफियान नागलेकर, फरझाना डांगे, सायमा चिकटे, बशीर मुर्तुझा, सुफियान बारगीर, नदीम सोलकर, इद्रीस फजलानी, अस्लम मेमन, असीफ अकबानी, मझहर मुकादम यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव आणि भगिनी सहभागी झाल्या होत्या.
रत्नागिरीतील या आंदोलनाने दहशतवादाविरोधातील एकजुटीचे दर्शन घडवले आणि समाजात शांतता व बंधुता कायम राखण्याचा संदेश दिला.