चिपळूण: वाशिष्ठी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

तलहा मन्सूर घारे, वय १५, असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.,

ही दुर्दैवी घटना बुधवार, 19 मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे आणि त्याचे चार मित्र वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेले होते.

उष्णतेमुळे हैराण झालेल्या या मुलांनी नदीत उतरण्याचा निर्णय घेतला.

सायंकाळच्या सुमारास, ते पाण्यात उतरले. परंतु वाशिष्ठी नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा बुडू लागला.

मित्राला बुडताना पाहून त्याच्यासोबतचे इतर मित्र घाबरले आणि त्याला वाचवू शकले नाहीत. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.

आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने नदीकिनारी धाव घेतली आणि बोटींच्या मदतीने तलहाचा शोध सुरू केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक बोटचालकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेतला असता, अर्ध्या तासानंतर तलहाचा मृतदेह सापडला.

तलहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.