
रत्नागिरी : पत्रकार दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले असून, या घटनेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर झालेला हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे सांगत, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
जिल्ह्यातील पत्रकार या घटनेमुळे आक्रमक झाले असून, हल्लेखोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तींचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या निवेदनाचा स्वीकार करून प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
प्रशासनाकडून पोलिसांना सखोल तपासाच्या सूचना दिल्या जातील आणि कायद्यानुसार कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply