मधमाशी चावली आणि महिलेचा जीव गेला

रत्नागिरी : आंब्याच्या बागेत काम करीत असताना मधमाशांनी चावा घेतल्याने उपचाराच्या दरम्यान नांदिवडे येथे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेल्या महिलेचे नाव सुनीता चंद्रकांत गुरव (६५)असे आहे.

नांदिवडे येथील उदय जोग यांनी याबाबत जयगड पोलीस स्थानकात खबर दिली असून नांदिवडे घोघळवाडी येथील राहणारी सुनीता चंद्रकांत गुरव ही बेलवाडी येथील आंब्याच्या कलमाच्या बागेमध्ये साफसफाई करण्यासाठी आली होती. ती साफसफाई करीत असताना त्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या.

त्यांना रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*