रत्नागिरी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील १२ आणि १३ फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेने या आठवड्यात ब्लॉक घेतला आहे.

त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

आरंभ स्थानकांत बदल झालेल्या गाड्या

  • १ मार्च रोजी सुटणारी २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस आता पनवेल येथून सुटेल.
  • २ मार्च रोजी सुटणाऱ्या १२०५१ मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि २२११९ मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादर येथून सुटतील.
  • १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल येथून नियोजित वेळेतच सुटेल.
    अंतिम स्थानकांत बदल झालेल्या गाड्या:
  • २६ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान २२१२० मडगाव-मुंबई तेजस एक्सप्रेस आणि १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या दादरपर्यंतच धावतील.
  • १ मार्च रोजी २०११२ मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस आणि १०१०४ मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस या गाड्या पनवेलपर्यंतच धावतील.
  • २६ फेब्रुवारी ते १ मार्च १२१३४ मंगळूर-मुंबई एक्सप्रेस ही गाडी ठाण्यापर्यंतच धावेल.