corona update

कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात 19 जणांचा मृत्यू

कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये. लोकांनी सर्वतोपरी काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या हळू हळू वाढत आहे. लोकांनी मास्क न वापरता रस्त्यावर बिंधास्तपणे फिरणं बंद केलं पाहिजे. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे.

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी सुचवलेले मुद्दे

ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे यांनी तातडीनं काय उपाय योजना करता येतील हे सुचवलं आहे. मदत पोहोचायला सुरुवात झाली आहे. पण मदतीचा वेग आणखी वाढला पाहिजे. आपण कल्पना न केलेली हानी कोकणकिनारपट्ट्यात झाली आहे. प्रत्येकानं शक्त ती मदत करणं आवश्यक आहे. मंदार फणसे यांनी केलेलं आवाहन गंभीरपणे घेणं आवश्यक आहे.