एस.टी.कर्मचारी यांनी माणुसकीच्या भावनेतून संप मागे घ्यावा-अजित पवार

लातुर:- दाेन पावलं सरकार मागे घेत आहे, दाेन पावलं संपकरी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी आले पाहिजे, महाराष्ट्र सर्वांचाच असून, माणुसकीच्या भावनेतून संप घ्यावा, असे आवाहन लातूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.शनिवारी लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलत हाेते.राज्यात गत दीड महिन्यांपासून सुरु असलेल्या संपाबाबत ते म्हणाले, एसटी ग्रामीण भागातील महत्वाचं वाहतुकीचे साधन आहे. सध्या शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. ग्रामीण भागातील काहीना रुग्णालयात नियमित उपचारासाठी जावे लागते. अशावेळी सुरु असलेल्या संपामुळे त्यांची नाहक पिळवणूक हाेते. आपल्या सर्वांचाच महाराष्ट्र आहे. माणुसकीच्या भावनेतून एसटी संपकरी कामगार, कर्मचाऱ्यांनी दाेन पावलं मागे येत संप मागे घ्यावा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*