रायगड : राष्ट्रीय आंबा दिनानिमित्त
कृषी महाविद्यालय, दापोली येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत ‘कृषी संजीवनी’ गटाने खांब (रोहा) या गावात कोय कलमाबद्दल माहिती दिली व त्या पद्धतीने कलम कशाप्रकारे बांधून घ्यावे हे त्यांना प्रात्यक्षिकरित्या दाखवले.

या सोबतच आंब्याच्या झाडांची लागवण कशी करावी, आंब्याच्या झाडासाठी कोणती खते वापरावी, आंब्याच्या विविध जाती व त्यांचे महत्व या संदर्भात सविस्तर माहिती कृषिदुतांतर्फे शेतकऱ्यांना देण्यात आली.

या प्रात्यक्षिकासाठी के.व्ही.के. रोहाचे चेअरमन डॉ. मनोज तलाठी, डॉ. जीवन अरेकर, कृषी महाविद्यालायचे डॉ. महेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.