रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये १५ एप्रिल पर्यंत वाढ

रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊन १५ एप्रिल पर्यंतवाढवण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी बुधवारी केली. लॉकडाऊन कालावधी वाढवताना जिल्हाधिकारी यांच्याकडून नवी नियमावलीजाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार दुकानामध्ये अथवा दुकान परिसरात ५ पेक्षा अधिक व्यक्तीअसल्यास कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय ग्राहकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारकअसणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुकणे हे दंडनीय असून सार्वजनिक ठिकाणी दारू, तंबाखूजन्य पदार्थखाण्यास व धुंकण्यास प्रतिबंध असणार आहे. शक्य त्या ठिकाणी घरातून काम करावे, कार्यालयातीलसार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध ठेवावे, कार्यालयात वारंवारनिर्जंतुकीकरण करावे, रात्री ८ ते सकाळी ७ संचारबंदीअसून याचे उल्लंघन करणाऱ्याला १००० दंड ठोठावण्यात येणार आहे. उद्याने व सार्वजनिक ठिकाण ८ ते ७ याकालावधीत बंद राहतील, मॉल्स, सभागृह, हॉटेल्स ८ ते ७या वेळेत बंद राहतील मात्र हॉटेल्स मधून होम डिलिव्हरीसुरू राहील. लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक लोकांनाउपस्थित राहण्यासाठी परवानगी नाही. अंतिमसंस्कारासाठी केवळ २० जण हजर राहण्यास परवानगी असणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*