रत्नागिरी : जिल्ह्यातील भाटीमिऱ्या गावाचे सुपुत्र जितेंद्र भोळे यांची महाराष्ट्र विधानसभा सचिव (१) या पदावर नियुक्ती झाली आहे.

या नियुक्तीमुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

भोळे यांनी यापूर्वी विधिमंडळाच्या सचिव पदावर प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. 

जितेंद्र भोळे यांनी रत्नागिरी जिल्हा न्यायालयात काही काळ वकिलीचा व्यवसाय केला होता.

न्यायालयीन आणि विधिमंडळ प्रशासनातील त्यांचा अनुभव त्यांच्या या नव्या भूमिकेला पूरक ठरणार आहे.

त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या कार्यप्रणालीत नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

रत्नागिरीतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. शैलेंद्र भोळे आणि अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निलेंद्र भोळे यांचे ते धाकटे बंधू आहेत.

जितेंद्र भोळे यांच्या या नियुक्तीचे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सक्षम होईल, असा विश्वास विधान भवनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

या नव्या जबाबदारीसाठी श्री. जितेंद्र भोळे यांना मंत्र्यांकडून, आमदारांकडून तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. 

विशेष म्हणजे, रत्नागिरी जिल्ह्याला दुसऱ्यांदा विधानसभा सचिव (१) पद मिळाले आहे.

यापूर्वी जिल्ह्याचे सुपुत्र भास्कर शेटे यांनी या पदावरून निवृत्ती स्वीकारली होती.

जितेंद्र भोळे यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

त्यांच्या कार्यकाळात विधानसभेच्या प्रशासकीय कामकाजात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा आहे.