फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पूर्व परवानगीने बाहेर पडता येणार
राज्य सरकारने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली असून शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहणार आहे. या दरम्यान नागरिकांना फक्त वैद्यकीय अथवा अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार आहे. तसेच शनिवार व रविवार पूर्ण लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा सुरू राहतील यामध्ये भाजीपाला, दूध, मेडिकल व दवाखाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहतील. तरी नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.