बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी,पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार

बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

सुरुवात त्यांनी केलीय, पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही -केंद्रीय मंत्री नारायण राणे

माझ्या मुंबईच्या घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार असतील. सुरुवात त्यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला

बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच; मा. सर्वोच्च न्यायालय

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन परतलं विमान; विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “दोन्ही देशांमधील तणाव….”

रशिया आणि युक्रेनमधील वाद रोज चिघळत आहे. त्यामुळे युक्रेनध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत.

मलिकांची ५ तासांपासून ईडीकडून चौकशी, ई़डीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात आणले असून त्यांची मागील ५ तासांपासून चौकशी सुरू आहे.