No Image

आई वडील दोन्ही पाॅझिटिव्ह असतील तर त्यांच्या मुलांचे तात्पुरत्या स्वरूपात शासन घेणार पालकत्व..

आईवडील दोन्हीही पॉझिटीव्ह असतील आणि त्यांना कुणीही नातेवाईक नसतील किंवा अनाथ, एक पालक असलेल्या मुलांचे काय होणार हा प्रश्न शेजारील प्रत्येकालाच पडलेला असतो आता अशा (वय वर्ष ६ ते वय वर्ष १८) मुलांचे पालकत्व जिल्ह्यातील लहान मुलांच्या संस्था घेणार आहेत.

डॉक्टरांना कोरोना रुग्णांवरील उपचारांबाबत वैद्यकीय तज्ञा मार्फत मार्गदर्शन करण्यात यावे_जि .प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

माझा डॉक्टर’ ही संकल्पना जिल्ह्यात राबविताना घ्यावयाच्या खबरदारी बाबत जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना पत्र लिहिलं आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून घोसाळकर कुटुंबाचे सांत्वन

आपल्या लाडक्या नातीला भेटून परतत असताना बोरज येथे विद्युत तारेच्या स्पर्शाने आजी आजोबांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेड तालुक्यातील बोरज येथील घोसाळकर कुटूंबाला भेटून त्यांचे सांत्वन केले.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार जमिन विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत

चक्रीवादळाच्या नुकसानीचे पंचनामे गतिमान पद्धतीने करा : पालकमंत्री ॲड. अनिल परब

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.