अविनाश लाड रत्नागिरी काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी साखरप्याचे सुपुत्र व नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड यांची निवड झाली आहे. कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नियुक्ती केली आहे.

अवगनाशत्रलाड यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे.

गेले अनेक दिवस दिवंगत नेते माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भोसले यांच्या आकस्मिक निधनानंतर हे पद रिक्त राहिले होते. या पदावर जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी योग्य नेता कोण याची चाचपणी सुरु होती. तर काही ठिकाणी या पदासाठी रस्सीखेचही सुरु होती. इच्छुकांनी मुलाखतीही दिल्या होत्या.

या स्पर्धेत साखरप्याचे सुपुत्र अविनाश लाड यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या निवडीने जिल्हा कॉंग्रेसला एक उमदं नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना उभारी मिळणार असल्याचं बोललं जाय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*