रत्नागिरी दि.12:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 12 जुलै 2021 ते 16 जुलै 2021 पर्यंत रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.