मुंबई: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेला महाराष्ट्र सध्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याचे आदेशही दिले आहेत. तसंच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असल्याने त्यादृष्टीने तयारी केली जात आहे. यावेळी ही तिसरी लाट नेमकी कधी येणार यावरुन सध्या अनेक शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील दोन ते चार आठवड्यात करोनाची तिसरी लाट येईल अशी चर्चा असून टास्क फोर्सने यासंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.