रत्नागिरी:- वादळ असो किंवा महापूर, कोणतीही नैसर्गिक संकटं आली की ऊन, वारा, पाऊस याची कसलीही तमा न बाळगता महावितरणचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेवून वीज पुरवठा सुरळीत करतात. एसटी महामंडळाचे कर्मचारीही कुठल्याही संकटात सेवा सुरळीत रहावी यासाठी झटत असतात. अशा महावितरणच्या व एसटीच्या चिपळुणातील सर्व कर्मचार्यांचा सन्मान आ. भास्कर जाधव यांनी गुरूवारी केला. चिपळूण येथील संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
महापुरात अहोरात्र मेहनत घेणार्या यंत्रणांचा आ. जाधव यांचेकडून सत्कार

Byमाय कोकण प्रतिनिधी
Aug 7, 2021