कोकण विभागात उष्णतेची लाट
पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.राज्यात इतरत्रही आता हवामान कोरडे होणार असल्याने तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.
