शिवसेनेमध्ये प्रवेश करण्या आधीच शिवसेना UBT मधून संजय कदम यांची हकालपट्टी

रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर रत्नागिरीचे (खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

  • हकालपट्टीचे कारण:
  • संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
  • त्यामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
  • गेले काही दिवस संजय कदम शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती.
  • त्यांच्याकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
  • दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेसेनेच्या वाटवर आहेत, जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल.हकालपट्टीची माहिती:
  • हकालपट्टीची माहिती:
  • ठाकरे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
  • उद्धव ठाकरे यांना बसलेले मोठे धक्के:
  • विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत.
  • कोकण हा बालेकिल्ला असतानाही अतिदुर्लक्ष झाल्याने उद्धवसेनेची पडझड होतच राहिली.
    या घटनेमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*