रत्नागिरी : राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री लॉकडाऊनची मुदत संपत असल्याने गुरुवारपासून अनलॉकसुरू होणार का? याबाबत नागरिकांच्या मनात असलेले संभ्रम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दूर केले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने व आस्थापना या सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.