मुंबई:- राज्यात सध्या वीज बील माफी शक्य नाही, त्यासाठी जर केंद्राने मदत केली तर विचार केला जाऊ शकतो, असं मत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी औरंगाबादेत व्यक्त केले मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील कुरबुरी प्रसार माध्यमांमधून समोर आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमच्यामध्ये चांगला समन्वय आहे. यामुळे सरकारचा पाच वर्षाचा कालावधी नक्की पुर्ण करेल.