संकटात सापडलेल्या रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण

राज्यात मागील काही वर्षांत संकटात सापडलेल्या रात्रशाळांसाठी लवकरच नवे धोरण आणले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून त्यासाठीचा एक जीआरही जारी करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील रात्रशाळांच्या अडचणींसाठी लवकरच नवे धोरण आणले जाईल अशी घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर शालेय‍ शिक्षण विभागाने जीआर जारी केला आहे. या नव्या धोरणात रात्रशाळेत शिकणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय शिक्षक, रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सेवाविषयक बाबी, संचमान्यतेचा नव्या धोरणात विचार केला जाणरा आहे. तसेच अडचणीत सापडलेल्या रात्र शाळांना पुन्हा बळकटी कशी मिळेल यावर भर दिला जाणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*