मुंबई गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामांबाबत केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर विविध भागात रस्ता रोको आंदोलन केलं गेलं. या आंदोलनामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड आपल्या कार्यकर्त्यांसह आंदोलनात सहभागी झाले होते.
पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम आदींनी याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.