राज्यात शुक्रवारपर्यत चार कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक लशींच्या मात्रा

केंद्र सरकारकडून आवश्यकतेएवढ्या करोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा होत नसल्याने राज्य सरकारपुढे अडचण निर्माण झाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात चार कोटी ६३ लाखांपेक्षा अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी तीन कोटी ४५ लाख ३० हजारांपेक्षा अधिक जणांना पहिली मात्रा दिली आहे. तर जवळपास एक कोटी १८ लाख ४६ हजार जणांना दोन्हीही डोस दिलेले आहेत. पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ३४ टक्के नागरिकांचे दुसरे लसीकरण आतापर्यंत झालेले आहे. तर दोन कोटी २६ लाखांपेक्षा अधिक (६६ टक्के) व्यक्तींचे अद्याप दुसरे लसीकरण व्हायचे असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*