नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चव्हाण यांची पंतप्रधानांशी ही पहिली भेट होती. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या संघटनात्मक कामाचा आढावा पंतप्रधानांना सादर केला आणि पक्षाच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्षवाढीच्या दिशेबाबत सविस्तर चर्चा केली.
चव्हाण यांनी यावेळी ‘कार्य विस्तार अभियान’ संदर्भातील विशेष पुस्तिका पंतप्रधानांना भेट दिली.

या पुस्तिकेत महाराष्ट्रात बूथ पातळीवर सुरू असलेले संघटनात्मक कार्य, सदस्य नोंदणी मोहीम, पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, संपर्क अभियान आणि महिला तसेच युवा आघाड्यांच्या उपक्रमांचा सविस्तर तपशील समाविष्ट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविंद्र चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीमुळे महाराष्ट्र भाजपच्या कार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.