पुढील तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु करणार

पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार असल्याची घोषणा केली आहे. देशभरात रेल्वेचा जाळं आणि मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. पुढच्या तीन वर्षात 400 वंदे भारत रेल्वे सुरु होणार आहेत. शहरांमध्ये वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या मेट्रोच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. मेट्रोचं जाळं प्राधान्यानं विकसित करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे. हॉस्पिटलिटी उद्योगांना कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*