महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

मुंबई : लॉकडाऊन सुरु झाल्याची खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळं लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*