मुंबई : २७ फेब्रुवारी २०२१ या मराठी भाषा दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी प्रत्येक सुपुत्राने प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन केले आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित एका परिसंवाद कार्यक्रमात लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठीत बोलयला आपण लाजतो पण समोरचा फाडफाड इंग्रजी बोलायला लागले की आपण घाबरतो. पण फ्रान्स, जर्मनी, चीन सारख्या देशांमधील नागरिक त्यांची भाषा बोलतात. भाषेचा अभिमान जरुर असावा दुराभीमान नसावा. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.