रत्नागिरी – जिल्ह्यासाठी चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. शनिवारी दिवसभरात 1,674 जणांची तपासणी झाली. त्यापैकी तब्बल 134 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीत 431 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभरात 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 754 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.31 टक्के आहे. नव्याने 134 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 692 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 321 तर संस्थात्मक विलीगिकरणात 110 रुग्ण उपचार घेत आहेत.