राज्यात आज ८ हजारांहून अधिक नवे करोनाबाधित, 51 मृत्यू


मुंबई: राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात काल(शुक्रवार) ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित आढळल्यानंतर, आजदेखील ८ हजार ६२३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून करोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*