रसाळगड किल्ल्यावरील ४०० फूट दरीतील तोफ गडावर ठेवण्यात आली

सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी गेली ४ वर्ष कार्य जातात असून आजवर मंडणगड, बाणकोट किल्क्यांवर तोफांना तोफगाडे बसविण्यात आले व अनेक दुर्गसंवर्धन माहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील रसाळगड किल्क्यांवर दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी दुर्गसंवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले, या मोहिमेदरम्यान गडाच्या दक्षिण दिशेकडील दरीमध्ये ४०० फूट खोल दरीमध्ये अर्धा टन वजनाची व ५ फूट लांबीची तोफ अवघ्या ४ तासात संस्थेच्या ३५ दुर्गसेवकांनी तोफ गडावर आणली व गडावरील झोलाई देवीच्या मंदिरासमोर तोफ ठेवण्यात आली. कित्येक वर्षांपासून हि तोफ दरीमध्ये पडून दुर्लक्षित होती या तोफेस आज गडावर विराजमान झाली असून आता ही तोफ पर्यटक पाहू शकतात.

तोफ गडावर घेऊन जात असताना !

सध्या या गडावर एकूण १८ तोफा आहेत. हा किल्ला जिल्ह्याच्या पर्यटन विकास दृष्टीने महत्वाचा आहे.

सदर मोहिमेला विशेष सहकार्य म्हणून सौ.जान्हवी काजारी, जान्हवी कुळे , पूर्वी पाडलेकर यांचे सहकार्य लाभले तसेच या मोहिमेच्या नियोजनात ललितेश दिवटे, राहुल खांबे, अरुण नलावडे, केतन डोंबळे, आकाश मंचेकर, महेश जाधव, सर्वज्ञ रिसबुड, सुरज पोमेंडकर, सोमेश्वर बुरुनकर, नंदकुमार झाडेकर, वैभव सागवेकर, प्रभात पलसमकर नियोजनात सहभागी होते. अशी माहिती खेड विभाग प्रमुख अमोल भुवड यांनी दिली, तसेच या मोहिमेत श्रीवर्धन विभाग, मंडणगड विभाग, दापोली विभाग, भिवंडी विभाग, मुंबई विभाग हे विभाग उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*