दापोली- राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालानुसार आपल्या राज्यामध्ये दररोज सुमारे ४१०० ते ५००० रुग्णांना रक्ताची गरज असते. गंभीर आजारासाठी करण्यात येणान्या शस्त्रकिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण यांना रक्ताची गरज असते. गंभीर आजारामध्ये योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचे रक्त दुसन्या मानवाचे प्राण वाचवू शकते. आज आपण कितीही विकसित झालो असलो तरी कोणीही रक्ताच्या कारखान्याची निर्मिती करू शकले नाही. तसे दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही. त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्व आहे.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान अस समजलं जात. राज्यातील रक्तपेढयांगध्ये रक्ताचा साठा वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका (वाकवली विभाग) आणि निर्मल ग्रामपंचायत,कुंभवे यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभवे येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास श्री. स्वामी समर्थ रक्तपेढी, डेरवण या रक्तपेढीचे विशेष सहकार्य लाभले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. अनंत मांडवकर (सरपंच,कुंभवे), श्री. रविंद्र घडवले, डॉ. प्रसाद करमरकर, श्री. आर. बी. अगरवाल (श्री. स्वामी समर्थ रक्तपेढी, डेरवण) यांच्या हस्ते श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पाहार अर्पण करून करण्यात आले. कुंभवे येथे प्रथम रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीरास स्थानिकांचा प्रतिसाद चांगला होता. वाकवली पंचक्रोशीतील युवकांनी तसेच दापोली शहरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. या शिबिरामध्ये एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याआधी सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीरे, गडकिल्ले साफसफाई, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी सह्याद्री प्रतिष्ठान नावारुपास आली आहे. प्रतिष्ठानमार्फत पत्रकार चंद्रशेखर जोशी(सकाळ ), रुपेश वाईकर (प्रहार) यांचा गौरव करण्यात आला.
