रेल्वे सुरक्षा दल ऍक्शन मोडवर, चिपळूण स्थानकावर प्रवासी जागरूकता मोहीम
चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या
आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे चिपळूण स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखिल आत प्रवेश करता येत नाही, परिणामी प्रवास न झाल्याने त्यांच्या तिकिटाचे पैसे वाया जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लक्ष वेधले असून, दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.
