शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यासाठी १४ व्हेंटिलेटर देण्यात आले. त्यापैकी रत्नागिरीतील ५ व्हेंटिलेटरचे शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑक्सीजन कॉन्सेंटेटरपाठोपाठ व्हेंटिलेटरची मदत केली आहे. जिल्ह्यासाठी देण्यात येणार्‍या व्हेंटिलेटरचे गुरुवारी राजापूरमध्ये लोकार्पण झाले. राजापूरमध्ये ३ व्हेंटिलेटर देण्यात आले. आज रत्नागिरीमध्ये ५ व्हेंटिलेटर देण्यात आले असून चिपळूण आणि दापोलीमध्येही प्रत्येकी 3 व्हेंटिलेटर देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.