रत्नागिरीः- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 53 अहवालांमध्ये तब्बल 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 315 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 76 हजार 687 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.47 टक्के आहे. नव्याने 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 494 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 234 तर संस्थात्मक विलगीकरणात 81 रुग्ण उपचार घेत आहेत.